गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली : करोनामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळित झाले असून, हातावर पोट असणार्‍या कामगार, गोर-गरिबांचे मोठे हाल होत असल्यामुळे गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे बूस्टर पॅकेज गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. 
सध्या आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी झोकून देऊन काम करत आहेत. या क्षेत्रात काम करत असलेल्यांचा 50 लाख रुपयांचा जीवन विमा उतरवला जाणार आहे. 20 लाख कर्मचार्‍यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका (आशाताई), स्वच्छता कर्मचारी यांनाही विम्याचे संरक्षण दिले जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत 80 कोटी नागरिक निश्‍चित करण्यात आले आहेत. एकाही व्यक्तीला उपाशी झोपू दिले जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त 5 किलो तांदूळ किंवा गहू तीन महिन्यांपर्यंत मोफत दिले जातील. हे अतिरिक्त लाभ मोफत असतील. गहू आणि तांदळाबरोबर एक किलो डाळही दिली जाणार आहे.  रोख पैसे हस्तांतराबाबत 8 मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यात शेतकरी, मनरेगा मजूर, गरीब विधवा, गरीब दिव्यांग आणि गरीब पेन्शनधारक, जनधन योजना, उज्ज्वला योजनेचे लाभार्थी, महिलांचे स्वयं सहायत्ता समूह, संघटित क्षेत्राचे कर्मचारी आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे.  पंतप्रधान किसान योजना, किसान सन्मान निधीचा फायदा 8 कोटी 70 लाख शेतकर्‍यांना मिळेल. 2 हजाराचा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित केला जाईल.  मनरेगा मजुरांची दैनिक मजुरी 182 वरुन 202 रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवांना तीन महिन्यांपर्यंत अतिरिक्त 1 हजार रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हप्त्यात दिली जाईल. 3 कोटी लोकांना याचा लाभ मिळेल. करोनामुळे देशातील असंघटित, हातावर पोट असणारा, वयोवृद्ध आणि इतर क्षेत्रातील लोकांच्या उदरर्निवाहाचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. सरकारनं तातडीनं मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेससह सर्वच पक्षांनी केली होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. यात देशातील शेतकर्‍यांनाही दिलासा देण्यात आला आहे. सीतारामन म्हणाल्या की, ‘देशातील इतर घटकांप्रमाणेच शेतकर्‍यांच्या संदर्भातही सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेतून सरकारनं शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. त्यातून पहिला हप्ता दोन हजार रुपये तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत,’ अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना मोफत सिलिंडर
उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी महिलांना मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत. यामुळे 20 कोटी महिलांना लाभ मिळणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
तीन महिने 5 किलो गहू, तांदूळ मिळणार मोफत
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. गरिब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आता सरकारने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक पॅकेजची घोषणा केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबाला पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळ दिली जाणार आहे.


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश